अहमदनगर

कौटुंबिक समाधान नसल्यामुळे माणसे दुःखी ः ह.भ.प. निव्रुत्ती इंदुरीकर

कौटुंबिक समाधान नसल्यामुळे माणसे दुःखी ः ह.भ.प. निव्रुत्ती इंदुरीकर

सुनील नजन

आज प्रत्येक कुटुंबात समाधान नसल्यामुळे माणसे दुःखी आहेत असे उद्गगार ह.भ.प.निव्रुत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर) यांनी काढले. ते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी खुर्द मधील गोटुंबे आखाडा येथिल अण्णासाहेब बाचकर यांच्या मातोश्री वै.दगडाबाई रंगनाथ बाचकर यांच्या पुंण्यस्मरणा निमित्त आयोजित किर्तनाप्रसंगी बोलत होते.इंदुरीकर पुढे म्हणाले की संसारात भांडणहोणे हे नाविन्य नाही पण भांडणातुन माघार घेण हा स्वाभिमान आहे. माघारीत जय आहे. वीज, वाणी, पाणी हे जपून वापरा,अंगातली ताकद जपून वापरा,भांडण करण्यात अजिबात मजा नाही असे अनेक पैलू सांगत ऊपस्थीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खळखळून हसविले.याप्रसंगी विजय तमनर,अरुण तनपुरे, दादाभाऊ चितळकर,शंकर खेमनर,निव्रुत्ती कोळपे, रावसाहेब खेमनर,गणपत नान्नोर,ऊत्तम म्हसे,विक्रम तांबे,अशोक कोळेकर, विजयमाला माने,राहुरीच्या मा. नगराध्यक्षा सौ उषाताई तनपुरे,आणि बाचकर परिवारासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button