लोणंद नगरपंचायत वतीने पाणीपुरवठा दूषित असल्याने गोरगरीब जनता साथीच्या आजाराने बेजार म्हणून नगर पंचायत कार्यालय वर मोर्चा
दिलीप वाघमारे
लोणंद शहरामध्ये होत असलेला पाणीपुरवठा गेले अनेक दिवस दूषित व गढूळ पाणी यामुळे ग्रामस्थांच्या हजार पणाचे साथीचे रोग फैलावले आहेत शहरातून लहान मुलांच्या पासून ज्येष्ठ नागरिक पर्यंत अनेक आजार जडू लागले म्हणून नगरसेवक कुसुम शिरतोडे सुलेमान कच्ची यांच्या नेतृत्वाखाली विश्वास शिरतोडे सुनील बावधनकर यांच्या उपस्थितीमध्ये 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होऊन शहरातून घोषणा देत मोर्चाचे विसर्जन नगरपंचायतीच्या प्रार्थना झाले यावेळी विश्वास शिरतोडे जावेद पटेल सचिन नाईक नवरे सुलेमान कच्ची यांची भाषणे झाली यावेळी खंडाळा तहसील कार्यालयाच्या वतीने लावंड ऑफिसर यांना मोर्चाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी लावंड म्हणाले ग्रामस्थांच्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचू व सखोल चौकशीनंतर न्याय दिला जाईल असे ठोस आश्वासन दिले मोर्चा शांत होऊन सांगता समारोप संपन्न झाला याप्रसंगी नाना जाधव सचिन नाईक नवरे नगरसेवक कुसुम शिरतोडे सुलेमान कच्ची तात्या मोरे शहरातील असंख्य कार्यकर्ते महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहिले.
यावेळी लोणंद सपोनि संतोष चौधरी व त्यांचे सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता शहरामध्ये अनुचित प्रकार घडला नाही.