Amalner

? Big Breaking.. जळगांव चि..(फ)..!ऑफिसरची अमळनेर गटविकास अधिकाऱ्याला फूस…!उच्च न्यायालयात अकार्यक्षम गटविकास अधिकाऱ्यासाठी मागितली माफी…

? Big Breaking.. जळगांव चि..(फ)..!ऑफिसरची अमळनेर गटविकास अधिकाऱ्याला फूस…!उच्च न्यायालयात अकार्यक्षम गटविकास अधिकाऱ्यासाठी मागितली माफी...

अमळनेर येथे नुकताच अमळनेर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ आणि इतर 5 कर्मचाऱ्यांवर अट्रोसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गटविकास अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम जळगांव जिल्ह्याचे मुख्याधिकारी बी एन पाटील करत आहेत.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की जानवे या गावातील वॉटर प्युरीफाईड योजनेंतर्गत मोठा अपहार झाल्याची व इतर 14 व्या वित्त आयोगा त अपहार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी योग्य विहित वेळेत कार्यवाही न केल्याने सदर प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

अमळनेर जानवे गावातील 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 3 लाख 26 हजार एव्हढा अपहार केल्या प्रकरणी गावातील नागरिक शरद पाटील यांनी 7 फेब्रुवारी 2019 रोजी गटविकास अधिकारी वायाळ यांना लेखी तक्रार केली होती. सदर भ्रष्टाचार ची चौकशी करून लेखी खुलासा मागविण्यात आला होता. परंतु निगर गठ्ठ सरपंच आणि गटविकास अधिकारी यांनी कायद्याची तमा न बाळगता कोणताही खुलासा किंवा कार्यवाही केली नाही. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्या मुळे तक्रार दार यांनी दि 6 ऑगस्ट 2019 रोजी संबंधित सर्व अधिकारी यांना वरील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकां वर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी लेखी तक्रार दाखल केली होती. या वरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्या मुळे 20 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार दार यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2020 च्या आदेशानुसार संबंधित अपहार करणाऱ्या व्यक्तीं विरुद्ध कोणतीही कार्यवाही आजता गायत केली नाही. त्यामुळे संबधित अपहार कर्त्यांची पाठ राखण करत असल्याचे सांगत दि 15 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयात हजर राहून कायदेशीर कारवाई का केली नाही याचा खुलासा मागितला आहे.मुख्य तक्रारदार शरद पाटील यांच्या सोबत ऍड दिनेश पाटील,तसेच औरंगाबाद उच्च न्यायालय येथील ऍड परेश पाटील यांनी काम पाहिले आहे.

याबाबतीत उच्च न्यायालयाने खुलासा मागविला होता.या खुलास्यात मा मुख्याधिकारी यांनी अमळनेर गटविकास अधिकारी यांची बाजू घेत माफी मागितली आहे.मी उत्तर देतो आणि ते सबमिट करतो की थोडासा उशीर झाल्याने बिनशर्त माफी मागणे अपराधींवर उचलल्या जाणार्‍या पावले उचलण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही तसेच उशीर होणे हा हेतूपूर्वक नाही किंवा मुद्दाम नसून
प्रशासकीय व्यस्तता तसेच कोविड -१९ (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेली परिस्थिती मुळे शक्य झाले नाही. त्यामुळे मी उच्च न्यायालयाची माफी मागतो. असे नमूद केले आहे.

? Big Breaking.. जळगांव चि..(फ)..!ऑफिसरची अमळनेर गटविकास अधिकाऱ्याला फूस...!उच्च न्यायालयात अकार्यक्षम गटविकास अधिकाऱ्यासाठी मागितली माफी...

मुख्याधिकारी बी एन पाटील यांनी गटविकास अधिकारी अमळनेर यांचा भ्रष्टाचार,मनमानी कारभार, तसेच आर्थिक अनियमितता या गोष्टींना पाठिशी घातले आहे. वास्तविक या सर्व तक्रारी सुरुवातीला मा मुख्याधिकारी यांच्या कडे करण्यात आलेल्या होत्या पण ते कदाचित निर्णय घेण्यास सक्षम नसल्याने त्यांनी वरील तक्रारीं सारख्या अनेक तक्रारीं कडे दुर्लक्ष करून अमळनेर गटविकास अधिकारी यांची कायम पाठराखण केली आहे.आणि भ्रष्टाचाराला खत पाणी घातले आहे. यामागील खर कारण अजून पर्यंत समजले नसून भविष्यात ही बाब मुख्याधिकारी यांना जड पडू शकते अशी चर्चा होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button