पाणीपुरवठा सुरळीत करा – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे, त्यामुळे त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे जलदगतीने करा, विविध नागरी समस्या जलदगतीने सोडवा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. या मागण्याचे निवेदन देत शिवसेनेचे शिष्टमंडळाने मनपा प्रशासकाची भेट घेतली. शहरात अनेक भागात रस्त्याची कामे अपूर्ण आहेत.
यामध्ये प्रामुख्याने आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, रोपळेकर हॉस्पिटल, जवाहर कॉलनी, गारखेडा, सिडको-हडको, जुने शहर, सातारा परिसर, मयूर पार्क भागत रस्ते खराब झाले आहे. याबाबत लक्ष देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख त्रिम्बक तुपे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, गटनेते मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, किशोर नागरे आदींची उपस्थिती होती.