यवतमाळ

शेतकऱ्यांना पंचविस हजार रूपयाची आर्थिक मदत दयावी > राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाची मागणी

शेतकऱ्यांना पंचविस हजार रूपयाची आर्थिक मदत दयावी > राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाची मागणी

रुस्तम शेख

यवतमाळ :-यवतमाळ जिल्हयात कळंब
तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस या मुख्य पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांची आर्थिक Iस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची तातडीने पाहणी करून शेतकऱ्याला हेक्टरी पंचविस हजार रुपये आर्थिक मदत दयावी,तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शेतकरी बांधव तालुक्याच्या ठिकाणी येण्यास असमर्थ असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज ग्रा प सचिव व तलाठी यांच्या मार्फत स्विकारण्यात यावे इ मागणीच्या संदर्भात राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांच्या हस्ते तहसिलदार साहेब कळंब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी अ मतीन,जावेद पठाण,अभि पांडे , सुधाकर निखाडे ,सारीकाताई ठोंबरे, सुधाकर पवार,फिरोज काजी, तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button