ग्रामसंवाद सरपंचसंघ महाराष्ट्र राज्या ची प्रदेश कार्यालय,औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील (दादा) यांच्या शुभ हस्ते उद्धघाटन करण्यात आले.
औरंगाबाद : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याचे ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकासाकरिता ही संघटना काम करत आहे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात संघटनेमार्फत सरपंच उपसरपंच सद्यस्य यांचे , अधिकार,व कर्तव्याची जाणिव करुन देवुन शासनाच्या विविध प्रकारच्या योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास काम करत आहे. दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित साधुन सर्व महाराष्ट्रातील ,आजी,माजी,सरपंच एकत्रीत यावेत संवाद घडावा विचारांचा देवान-घेवान व्हावा,आणि ग्रामविकास साधला जावा त्यातुन संपुर्ण महाराष्ट्र राज्याचा विकास व्हावा.या अनुश्रृंगाने आज दि. 05-06-2021 रोजी. ग्रामसंवाद सरपंचसंघ महराष्ट्र राज्य ची प्रदेश कार्यालयाची औरंगाबाद येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.तसेच कार्यक्रमास ग्रामसंवाद सरपंचसंघाचे प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे. यांच्या उपस्थितीत आणि ग्रामसंवाद सरपंचसंघ महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी झुम apps वर उपस्तित राहून कार्यालयाची स्थापना करुन उद्धाटन केले.व सरकारचे नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला.