फैजपूर

वैज्ञानिक दृष्टीकोन स्व विकासासोबतच समाज आणि देशाला पुढे नेतो – मा प्रा पी पी पाटील

वैज्ञानिक दृष्टीकोन स्व विकासासोबतच समाज आणि देशाला पुढे नेतो – मा प्रा पी पी पाटील

सलीम पिंजारी

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविल्या तर देशाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा असेल.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखून सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून देईल असे मत माननीय कुलगुरू प्रा पी पी पाटील यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP) आणि विज्ञान प्रसार, नवी दिल्ली यांच्या सहकार्या ने आदिवासी मुलांसाठी दोन दिवशीय विज्ञान मेळावा उद्घाटन सोहळा तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर यांच्या सहकार्याने सातपुडा विकास मंडळ पाल संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा, लोहारा येथे दिनांक 22 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्रा पी पी पाटील, कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते झाले तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा दादासाहेब दिलीप रामू पाटील, मा. डॉ अजित पाटणकर, सल्लागार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई, प्रा डॉ एस टी बेंद्रे, समन्वयक, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव , मा दीपक पाटील मा नितीन बारी, मा अजित पाटील, प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, मा डॉ अरुणा चौधरी, मा जीवन पाटणकर, मा प्रा डॉ के जी कोल्हे, सिनेट सदस्य, श्री प्रभात चौधरी, सचिव जनता शिक्षण मंडळ, खिरोदा, मा धनंजय चौधरी, श्री सुधाकर झोपे, मा श्री लियाकत जमादार, सरपंच लोहारा आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात लोहारा आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर करून करण्यात आले आणि वट वृक्षाची पूजा करून करण्यात आले. त्यानंतर खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि श्रध्देय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी बाल विज्ञान मेळाव्याचे समन्वयक प्रा डॉ सतीश चौधरी यांनी केले. आदिवासी भागातील मुलांच्या जाणिवा समृद्ध करणे आणि बालवयापासूनच विज्ञानाची आवड वृद्धिंगत करणे हा हेतू या कार्यक्रमाच्या आयोजनामागील आहे असे समन्वयक डॉ सतीश चौधरी यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ अजित पाटणकर, सल्लागार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे कौतुक करीत जे काम आपल्याला साठ वर्षात करता येणे शक्य नाही ते ही आदिवासी मुले फक्त सहा वर्षात पूर्ण करू शकतील मात्र त्यासाठी अद्ययावत सोयीसुविधा आणि अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

यावेळी मा दादासाहेब दिलीप रामू पाटील, राज्यपाल, नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी सांगितले की, स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनीच आदिवासी भागात शिक्षणाचे बीजारोपण केले. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड असणे आवश्यक आहे विद्यापीठाच्या योजना आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि तसे झाल्यास समाज विकासाला हातभार लागेल.
स्थानिकांच्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले.

बाल विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत कुलगुरू आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले त्यांनी अशा कार्यक्रमात धनाजी नाना महाविद्यालय सदैव एक पाऊल पुढे राहील असे आश्वासन दिले आणि भविष्यात या उपक्रमाचे यश निश्चित दिसेल अशी हमी दिली.
कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा राजश्री नेमाडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button