Jalana

जालन्यात भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने आक्रोश आंदोलन

जालन्यात भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने आक्रोश आंदोलन

जालना : भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यभरात ओबीसींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

न्यायालयात जाऊन राज्य सरकार फक्त पुढची तारीख मागत होते. मात्र यावर ठोस असे निर्णय घेत नसल्यामुळे ओबीसींचे हे आरक्षण रद्द झाल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळं राज्य सरकार ओबीसीला क्षुल्लक समजत असल्याचा निषेध म्हणून आज भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.

दरम्यान राज्य सरकारने यावर लवकरात लवकर ठोस उपाय नं केल्यास लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

*उदयवार्ता न्यूज मराठवाडा ब्युरो चीफ गणेश ढेंबरे*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button