Pune

तिरपाड येथील वनविभागाचे निवासस्थान बांधकामास ग्रामसभेचा विरोध

तिरपाड येथील वनविभागाचे निवासस्थान बांधकामास ग्रामसभेचा विरोध

ग्रामस्थ व वनविभाग यांच्यात संघर्ष सुरू

पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील तिरपाड , नाव्हेड , डोन नानवडे ,यांची संयुक्त सभा पार पडली . यावेळी तिरपाड याठिकाणी सुरू असणाऱ्या वनविभाग निवासस्थान बांधकामाबाबत ग्रामस्थांनी वारंवार विरोध केला आहे. पेसा सभा व ग्रामसभा यामध्ये देखी वारंवार विरोध केला आहे . तरीदेखील ग्रामस्थांच्या ठरावाला न जुमानता वन विभागाचे अधिकारी यांनी हे काम ग्रामस्थांना धमकावून चालू ठेवले आहे . याबाबत डोण या ठिकाणी सभा घेण्यात आली सभेसाठी तरुण बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी सभेमध्ये या कामाला संविधानिक लढा देऊन बंद करायची ठरले . त्याचप्रमाणे वन हक्क दावे असतील महाराष्ट्र शासन खाजगी वन हे सर्व दावे निकाली काढून मूळ मालकाच्या नावावर परत जमिनी करण्यात याव्यात त्यासाठी यापूर्वी ग्रामसभेमध्ये ठराव झालेले आहेत व सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा झाला आहे . सरकार ने पत्र काढून देखील या गोष्टी होत नाहीत याच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल तरुणांनी केला .
आदिवासी भागातील लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे ही खेदजनक बाब आंबेगाव तालुक्यामध्ये घडते आहे असे आबू दाते यांनी नमूद केले .
ज्यावेळी राजकीय कार्यक्रम असतात त्यावेळी लोकांना अमिष दाखवून गोळा करणारे राजकीय पुढारी सुद्धा या सभेकडे पाठ फिरवंतां ना दिसले त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे . याबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे फायद्याची असेल तर पुढारी असतात आणि अन्याय झाल्यावर पुढारी प्रशासनाची बाजू घेतात असा स्वर सभेत दिसला .
यापुढे आदिवासीला न्याय आणि हक्कासाठी झगडावे लागत आहे त्याचा कायद्याचा अवमान होत आहे ही बाब खेदजनक आहे असे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी यावेळी नमूद केले . यासाठी सर्वांनी आदिवासींच्या मागे उभे राहा असे आवाहन देखील केले. त्यानंतर सर्व सभा बांधकामाच्या ठिकाणी गेले असता तेथील वन अधिकाऱ्यांनी उद्या आपण काम बंद ठेवा असे सांगितले तोंडी सांगितले परंतु सकाळ पर्यंत दुसऱ्या दिवशी पोलिस लावून काम चालू ठेवले. यावेळी घोडेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सदर काम पेसा कायद्यामध्ये येत नाही आणि तुम्ही कायदा हातात धरायचा नाही असं ग्रामस्थांना सांगितले गरीब भोळाभाबडा आदिवासी या गोष्टीला घाबरून विरोध केला नाही. परंतु असा आदिवासींच्या बाबतीत किती दिवस पडणार अशी चर्चा आदिवासी भागांमध्ये आहे आदिवासींना कोणी वाली आहे का ? की आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांच्या आधारावर जगायचं असा सवाल उपस्थित होत आहे .
निवडणुकीपुरते पुढारी येतात आश्वासने देतात मात्र ज्यावेळी अन्याय होतो . त्यावेळेस मात्र आदिवासींना वाऱ्यावर सोडले जाते. वनविभागाची मनमानी व पेसा कायदयाची पायमल्ली झाली आहे. सदर वन विभागाचे बांधकाम चालू राहिले तर येणाऱ्या सर्व निवडणुकी वर बहिष्कार टाकायचा असं ठरले आहे. असा ठराव यापुढील ग्रामसभेत ग्रामस्थ घेणार आहेत. या वेळी मोठ्या संख्येने चारही गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button