यावल

महामार्गाचे रूपांतर झाले खड्ड्यात प्रशासनाचे दुर्लक्ष…

महामार्गाचे रूपांतर झाले खड्ड्यात
प्रशासनाचे दुर्लक्ष…

महामार्गाचे रूपांतर झाले खड्ड्यात प्रशासनाचे दुर्लक्ष...

यावल प्रतिनिधी सुरेश पाटील

यावल रावेर चोपडा तालुक्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून महामार्गाचे गाड रस्त्यात रूपांतर झाले असल्याने वाहनधारकांना  आपली वाहने चालविताना  मोठा अडथळा निर्माण होऊन कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे चालू वर्षात व मागील एक वर्षाच्या कालावधीत या बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु निकृष्ट प्रतीच्या मटेरियल मुळे तथा संबंधितांमध्ये जास्त टक्केवारी वाटप झाल्यामुळे बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडून महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. बांधकाम विभागाने त्वरित आपले लक्ष केंद्रित करून महामार्गाची तातडीने दुरुस्त करणे संदर्भात कार्यवाही करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button