प्रगती आदर्श केंद्र बिहार राज्याच्या वतीने रजनीकांत पाटील यांना कोरोना योद्धा म्हणून गौरव,सन्मान पत्र
प्रा.जयश्री साळुंखे
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथिल तरुण व एक सामजिक कार्यकर्ते तसेच ‘ठोस प्रहार ‘न्युज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणुन ओळखले जाणारे पत्रकार रजनीकांत दिलीप पाटील यांनी कोरोना महामारी संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता एक योद्धा म्हणून तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील विविध प्रकार च्या बातम्या चा आढावा घेत व कोरोना संदर्भात प्रशासनाची कामगीरी व कोरोना संकटात वेळोवेळी होणाऱ्या उपाययोजनांची महिती आपल्या बातमी द्वारे नागरिकांन पर्यन्त पोहोचवली असून तसेच कोरोना संकटात ग्रामीण भागात एक कोरोना योद्धा म्हणून उत्तम प्रकारे कामगिरी बाजवली असून त्यानां प्रगती आदर्श केंद्र समस्तीपूर बिहार राज्याच्या वतीने कोरोना 2020 महाराष्ट्र गौरव सन्मान पत्र देण्यात आले असून त्यांचे कौतुक करण्यात आले