महाराष्ट्रात “पोलीस-पोलीस” खेळ – आशिष शेलार
आशिष शेलार यांनीदेखील टीका केली असून महाराष्ट्रात काय “पोलीस-पोलीस” खेळ सुरु आहे का? अशी विचारणा केली आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “तक्रारदारावरच पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे.. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या, माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या पोलीस अजूनही मागावरच, आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलीसांकडून पाठलाग..महाराष्ट्रात काय “पोलीस-पोलीस” खेळ सुरु आहे का?” अशी टिका आशिष शेलार यांनी समीर वानखेडे प्रकरणात केली आहे.