Amalner

महापुराच्या पार्श्वभूमीवर अंशतः बाधित बोहरा गावातील १७६ कुटूंबाचे त्वरित पुनर्वसन करा..रिपब्लिकन पार्टी (अ)ची मागणी

महापुराच्या पार्श्वभूमीवर अंशतः बाधित बोहरा गावातील १७६ कुटूंबाचे त्वरित पुनर्वसन करा..रिपब्लिकन पार्टी (अ)ची मागणी

अमळनेर शहरप्रतिनिधी, येथील बोहरा गावाला नेहमी पुराचा धोका निर्माण होत असल्याने गावातील १७६ कुटूंबाचे मानवतेच्या दृष्टीने त्वरित पुनर्वसन करावे, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी(अ) च्या माध्यमातून अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले.

बोरी-तापी-अनेर या तिन्ही नद्यांना एकाच वेळेस पावसाळ्यात किंवा एखादया दिवसानंतर पुर आला तर महापुराचे स्वरुप येते. त्यामुळे काठावर वसलेली १७६ कुंटुबांची वस्तीच्या लोकांमध्ये घबराट व भिती निर्माण होते व रात्रदिवस जागे राहुन संकटाची परिस्थीतीला सामोरे जावे लागते अशी बिकट परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेस काठावर वसलेले सर्व वस्ती त्यामुळे जिवीत हानी होण्याची मोठी भिती निर्माण होते त्यासाठी तात्पुरते स्थलांतर करावे लागते व गुर- ढोरांना बांधण्यासाठी देखील कुठलीही जागा शिल्लक राहत नाही.तसेच संकट परिस्थितीत जिव वाचवण्यासाठी कोणतेही साधन राहत नाही.काठावर वसलेल्या वस्तीतील घरांची पडझड होते व घरांना त्याकाळात सतत ओलावा असतो. तसेच सर्द वातावरण असते. तसेच रोग- राई परिस्थिती निर्माण होते.गाई, म्हशी, शेळी-मेंढ्या, यांच्यावर साथीचे रोग येतात. अशी सर्व परिस्थिती निर्माण होत राहते.
पाडळसर धरणाचे काम सुरु करण्यात आले. सदर प्रकल्पाची उच्ची १३९.२४ तलांक आहे. प्रत्यक्षात पाणी अडवल्यामुळे बॅक वाटरची उच्ची वाढली. तसेच हतनुर धरणाचे काही प्रमाणात दरवाजे उघडले तर मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढतो. दर वर्षी हतनुर धरणाचे दरवाजे उघडले जाते. त्यामुळे काठावर वसलेली वस्तीच्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन जिव मुटीत धरुन राहतात. लोकवस्तीपासुन निम्न तापी प्रकल्प एक ते दिड किलोमीटर अतंरावर आहे. त्यामुळे काठावर वसलेले १७६ कुटुंबाची कायमस्वरुपाचा पाण्याचा पुराचा धोका असतो. महाराष्ट्र शासनाने बोहेरे गावाला अंशःता बांधीत म्हणुन समाविष्ट केलेले आहे.तरी ते लवकरात लवकर पुर्नवसन होणेस रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया(आंबेडकर गट ) ता. अमळनेर, जि.जळगांव यांच्या वतीने विनंती पुर्वक निवेदन देण्यात आले आहे. सदर पुर्नवसन न झाल्यास भविष्यात कोकणात घडलेल्या माळीण तळीये गावांसारखी भुख्खलनाची परिस्थिती ओढण्याची दाट शक्यता असुन जिवीत व
वित्ती हानी होवु शकते. तरी महाशयांनी आमच्या निवेदनाचा सहानुभुती पुर्वक व मानवतेचा दृष्टीकोनातुन विचार करुन योग्य न्याय द्यावा. व पुर्नवसन करावे अशी ही मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी यशवंत बैसाने, अरुण घोलप,
पितांबर वाघ,भगवान संदाणशिव,पंकज सोनवणे, सोपान धनगर, गणेश पवार, छब्रू मोरे,देविदास फुलपगारे, चंद्रकांत कोळी, [25/08, 8:31 pm] vijaygadhe10: उत्तम धनगर, सचिन पाथर्वड, रुपचंद धनगर, सचिन सैदाने, किरण बच्छाव,विनोद मोरे, गोविंदा भिल, संजय भिल,भरत भिल,धीरज कोळी,दीपक सैदाने, निलेश सोनवणे,संतोष मैराळे,नाना सैदाने आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button