Mumbai

? दंगल राजकारणाची..देवेंद्र फडणवीसांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही राष्ट्रवादीच्या  जयंत पाटील यांचे खडे बोल..

देवेंद्र फडणवीसांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे खडे बोल..

प्रा जयश्री दाभाडे

मुंबई : गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. तसेच यासाठी बुधवारी मुंबई भाजप कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवू असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावर आता आगामी महापालिका निवडणुकीत आमचा शिवसेनेला पाठिंबा राहणार आहे. मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

‘ठोस प्रहार न्युज’ शी बोलताना जयंत पाटील यांनी हा दावा केला. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असं फडणवीसांना वाटणं स्वाभाविक आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष महापालिकेत एकत्र येणार असून सत्ता आणण्याचं फडणवीसांच स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button