Amalner

Amalner: पावसाला खंड.. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी..

Amalner: पावसाला खंड.. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी..

अमळनेर पावसाचा खंड असल्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे व परिसरात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसिलदार रुपेशकुमार सुराणा आणि कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसा अभावी पिके सुकू लागली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करून भरपाई द्यावी. निवेदन देताना युवराज डी पाटील, निबा दयाराम चौधरी, विनोद नाना पाटील, विनोद नारायण पाटील, नारायण भालेराव पाटील, रावसाहेब दौलत पाटील, अरविंद लुका पाटील, गोविंदा काशिनाथ चौधरी, दगडू ढोमन चौधरी, लोटन रामा चौधरी, गोकुळ चुडामन पाटील,संतोष बापू चौधरी, पुरूषोत्तम लोटन चौधरी, भीमराव नारायण पाटील, छोटु पुना चौधरी, संतोष मन्सराम पाटील मनोहर दगा पाटील, संदिप लोटन पाटील, महेंद्र गटा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button