भिवंडी

अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांना राष्ट्रीय भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम २०१९ पुरस्कार

अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांना राष्ट्रीय भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम २०१९ पुरस्कार

भिवंडी प्रतिनिधी मिलिंद जाधव

वर्ल्ड ह्यूमन राईट पिपल्स कौन्सिल, यासंस्थेच्या वतीने देश विदेशातील, विविध क्षेत्रातील मानवी मूलभूत हक्कांसाठी, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी ठाणे शहरातील अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे हे ठाणे शहराचे मूळ रहिवासी असून विद्यार्थी दशेपासूनच, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करीत आले आहेत. त्याचबरोबर समाजसेवेतून मानवी मूलभूत हक्कांसाठी सदैव लढा देण्यासाठी अग्रेसर असतात आणि तेव्हापासून ते २० वर्ष अविरहितपणे विविध विषयांवर वर्तमानपत्रात लिखाण करीत आहेत. आतापर्यत त्यांचा सामाजिक व इतर विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार प्रसार करून भारतीय संविधान हाच देशाचा सर्वोच ग्रंथ मानून, प्रत्येक भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी अॅड. सोनावणे मानवाच्या हितासाठी कार्य करीत आहेत. आदिवासी ग्रामीण भागात जाऊन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शाळेचे सामुग्री भेट देत असतात, तसेच विधी क्षेत्रामध्ये हजारों गरीब पिढीत लोकांना आतापर्यंत मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केलेले आहेत. विविध साहित्य, कवी संमेलनातून आणि सामाजिक कार्यक्रमातून ते आपल्या कविता, लिखाणाच्या माध्यमातून मानवी हक्कांच्या हितासाठी समाजप्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे उत्तम कवी, लेखक, वकील, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. म्हणूनच त्यांच्या अमूल्य कार्याची दखल घेऊन दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी *भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार २०१९* प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली, मुंबई येथे दुपारी ०३:०० वाजता *बहरिन राष्ट्रातील WHR चे अध्यक्ष लीलाधर बायकम्पडी* यांच्या हस्ते कवी, लेखक अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल ज्येष्ठ हिंदी मराठी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे, विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड, गज़लकार निला वाघमारे, मनीषा मेश्राम, कवी किरण सोनावणे, युवा कवी मिलिंद जाधव, नागराज बोरसे, प्रभाकर शिंदे, राहुल भोजने, युवराज बागुल, योगेश जाधव, सागर कांबळे, रामचंद्र पवार, मारुती कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले, असून अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत रहावी म्हणून विविध ठिकाणाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button