भिवंडी

भिवंडी येथील युवा कवी मिलिंद जाधव  यांना राष्ट्रीय ”युवारत्न” पुरस्काराने सन्मानित

भिवंडी येथील युवा कवी मिलिंद जाधव यांना राष्ट्रीय ”युवारत्न” पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी राहुल खरात

सरदार रणजितसिंह सचदेव फाउंडेशन, मुंबई व साईमोह बहूउद्देशीय प्रतिष्ठान, शिर्डी यांच्या वतीने युवा कवी मिलिंद जाधव नुकतेच राष्ट्रीय ‘युवारत्न’ २०१९ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील प्रतिभावंताना, उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येत असून यावर्षी युवा कवी मिलिंद जाधव यांना हा मान मिळाला आहे.

युवा कवी मिलिंद जाधव हे भिवंडी तालुक्यातील समतानगर, पडघा या ग्रामीण भागात राहत असून ते विविध विषयावर उत्तम कविता लिहून प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्याचा सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता देखील वर्तमापत्रातून प्रकाशित केल्या आहेत. एवढंच नव्हे तर, अष्टपैलू व्यक्तित्वामुळे एक युवा कवी म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी साई निम ट्री हॉटेल रुई शिव रोड नाशिक येथे सरदार रणजितसिंह सचदेव फाउंडेशन, मुंबई व साईमोह बहूउद्देशीय प्रतिष्ठान, शिर्डी यांच्या वतीने १२ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात भारतीय सेनेचे पूर्व उपसेनापती लेप्टनंट जनरल गुरमीत सिंग, पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा, कार्यक्रमाचे आयोजक क्रांती महाजन, संमेलनाध्यक्ष राम गायकवाड, शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चनाताई गोते यांच्या हस्ते युवा कवी मिलिंद जाधव यांना राष्ट्रीय “युवारत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल जेष्ठ साहित्यिक प्रा.दामोदर मोरे जेष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, डॉ. विठ्ठल शिंदे, अँड. श्रीकृष्ण टोबरे,अँड प्रज्ञेश सोनावणे, यांनी त्यांचे अभिनंदन केले असून विविध ठिकाणाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button