Bollywood

नाना गिरी..!एक मच्छर साला आदमी को …!ना..ना करते प्यार..!

नाना गिरी..!एक मच्छर साला आदमी को …!ना..ना करते प्यार..!

मुंबई मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अत्यंत वास्तविक अभिनय आणि संवाद फेक च्या माध्यमातून यशाची शिखरे पादाक्रांत करणारा एक साधा मराठमोळा चेहरा म्हणजे नाना पाटेकर… अजिबात रूप नसलेला हडकुळा, चित्रपट सृष्टी कोणतीही पाश्र्वभूमी नसलेला हा माणूस आज प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करत आहे…1 जाने 1951 मध्ये मुरुड जंजिरा येथे जन्मलेल्या या नानाचं बालपण अतिशय साधारण परिस्थितीत गेलं. माध्यमिक शाळेत असताना, वडिलांकडून चित्रकलेचा वारसा होता.जे जे आर्टस् चा विद्यार्थी…त्या कलेची त्याला रुची निर्माण झाली.रायफल शूटिंग, अभिनय, वाचन, लेखन, ट्रेकिंग, योग आणि पाककला इ कला अवगत…

१९८५ साली सदाशिव पेठेत, पेरुगेट चौकात गोपी नावाचं नाॅनव्हेजचं हाॅटेल नुकतंच सुरु झालं होतं. तिथं एक खुरटी दाढी वाढवलेला काटकुळा तरुण, आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारताना अधूनमधून दिसायचा. त्यानंतर वर्षभराने अंकुश चित्रपट प्रदर्शित होऊन व प्रचंड गाजल्यावर, त्या ‘गोपी’ हाॅटेलातच, काऊंटरच्या मागे तो मालकासोबत जाऊन बसलेला नाना…माध्यमिक शिक्षणानंतर त्यानं जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. तिथं फाईन आर्ट्सचा डिप्लोमा प्राप्त केला. त्याच दरम्यान नाट्यकलेविषयी आकर्षण वाटू लागल्याने, तो विविध नाट्य स्पर्धेत भाग घेऊ लागला. विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे..

काही मराठी चित्रपटात छोट्या भूमिकेतही नाना चमकला. ‘सिंहासन’ मधील त्याची छोटी भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्यानंतर त्यानं, ‘भालू’ चित्रपटातील खलनायकी भूमिका साकारली.गमन ह्या चित्रपटातून प्रदर्पण केलं.. नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.
राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या आज की आवाज चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले पण चित्रपट पडला.१९८२ साली राघू मैना हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
१९८६ साली एन. चंद्रा या मराठी दिग्दर्शकाचा अंकुश हा चित्रपट प्रदर्शित झाला. तुफान गाजला व नानाला एकापाठोपाठ चित्रपट मिळू लागले. एन. चंद्रा यांच्याच प्रतिघात मध्ये त्यानं खलनायक रंगवला.
परिंदा चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सई परांजपे यांच्या ‘दिशा’ चित्रपटातील, पोटापाण्यासाठी खेड्यातून शहरात येऊन हताश झालेल्या कामगाराची त्याची भूमिका, अविस्मरणीय अशीच आहे.
तिरंगा चित्रपटात त्याची संवादफेकीची जुगलबंदी डायलाॅग किंग राजकुमारशी झाली.. ‘राजू बन गया जंटलमन’ चित्रपटात, चाळीतील अनेक नमुन्यांतील लक्षात राहणारा ‘अवलिया’, नानाने अफलातून साकारला होता..प्रहार हा चित्रपट नानाने स्वतः लिहिला व दिग्दर्शित केला. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘गुलाम ए मुस्तफा’, ‘हम दोनो’, ‘यशवंत’, शक्ती अशा अनेक चित्रपटांतून त्याने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या मात्र तो लक्षात राहिला..

तो ‘क्रांतिवीर’ म्हणूनच!
या चित्रपटाने त्याला राष्ट्रीय, फिल्मफेअर व स्टार स्क्रिनचा पुरस्कार मिळवून दिला. आजही कुणीही त्याच्या आवाजाची नक्कल करताना, ‘क्रांतिवीर’ मधील संवादच प्राधान्याने सादर करतात..हिंदीत कितीही नाव मिळविले असलं तरी नानानं मराठीला, आपुलकीनं जपलेलं आहे.. ‘सूत्रधार’, ‘नागीण’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘पक पक पाक’, ‘देऊळ’, ‘डाॅ. प्रकाश बाबा आमटे’, इ. चित्रपटांतून तो मराठी प्रेक्षकांना भावलेला आहे..
नटसम्राट चित्रपटातील त्यानं साकारलेला, अप्पा बेलवलकर अप्रतिम आहे!!
नाना, नाटकासाठी विजया मेहतांना व चित्रपटासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, यांना गुरुस्थानी मानतो.२०१५ पासून नाना व मकरंद अनासपुरे या दोघांनी नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना करुन महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे सामाजिक कार्य सुरु केले आहे.
नाना पाटेकर यांचे मित्र, श्रीकांत गद्रे यांनी नानाच्या तीस पस्तीस सवंगड्यांचे लेख संकलित करुन, ‘तुमचा आमचा नाना’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.१९८९ मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.

२०१४ मधील प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

१९९० फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा

१९९२ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अंगार

१९९५फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर

१९९५ राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर

१९९५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर

२००५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण

२००५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायकबअपहरण

२०१३ पद्मश्री पुरस्कार

२०१६ गोदावरी गौरव पुरस्कार

चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल

नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.
दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.

तुमचा आमचा नाना (लेखसंकलक श्रीकांत गद्रे) : या प्रकाशनाधीन पुस्तकात एन. चंद्रा, ना. धों. मनोहर, सुनील गावसकर, डॉ. रवी कसबेकर, रीमा, मंगेश तेंडुलकर, मोहन आगाशे, एन. चंद्रा, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, किशारी अमोणकर, सुभाष अवचट, रवींद्र साठे, अरविंद जगताप, विश्वजित शिंदे, डॉ. विकास आमटे, सुधीर गाडगीळ आदी ३५-४० लेखकांचे नानांविषक लेख आहेत.2015 मध्ये, नाना पाटेकर आणि त्यांचे सहकारी मित्र मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी 15,000 रुपयांचे धनादेश वितरित केले.तस पाहिलं तर नाना हे नाव जरी नकारात्मक पण सकारात्मक विचार करणाऱ्या नानावर सर्वच जण ‘नाऽनाऽ करते प्यार तुम्हींसे कर बैठे…!अशा या मराठी मातीतल्या नानाचा आम्हा सर्वांना, सार्थ अभिमान वाटतो!!!

नाना गिरी..!एक मच्छर साला आदमी को ...!ना..ना करते प्यार..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button