पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
आज महाविहिर ता.पेठ येथे ओम साई तरुण मित्रमंड व गावकरी मंडळी महाविहिर यांनी सुखकर्ता दुखहर्त्याचे आज आनंदाने निरोपर दिला.५ दिवस आनंदाने सर्व गावकरी मंडळी ऐकत्र येऊन गणरायाची पुजाअर्चना करण्यात आली. महाविहिर गावातील सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळ बालगोपाळ,तरुण मित्र मंडळ गणरायाला निरोप देण्यासाठी दिवसभर आतुर होते.कारण महाविहिर येथील तरुण मित्रमंडळींनी गणरायाच्या मिरवणुकीसाठी करंजुल ता.सुरगाणा येथील म्युझीक बँड मागविला होता. दुपारी २ वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
मिरवणुकीत शेजारच्या पाड्यावरील माळेगाव,आसदनपाडा, डुकरभुजी,वखारपाडा येथील तरुण,बालगोपाळ सामील झाले होते. मिरवणुक अगदी उत्साहात आनंदात पार पडली.मिरवणुकीत सर्व तरुण मंडळीणी बालगोपाळानी व महिला मंडळीणी नाचण्याचा खुप आनंद लुटला. कार्यक्रमाचे आयोजन ओम साई तरुण मित्रमंड व गावकरी मंडळी महाविहिर यांनी केली .मिरवणुकी प्रसंगी मिलन देशमुख,मनोहर देशमुख, महेश देशमुख,गिरीधर देशमुख,शांताराम देशमुख ,निलेश राऊत,दिपक चौधरी,तुशार चौधरी,संदिप चौधरी. पुंडलिक जाधव,चंदर देशमुख, हणुमंत कडाळी, गावकरी मंडळी व महिला मंडळ ,बाळगोपाळ महाविहिर आदिं उपस्थीत होते.