Amalner

तालुक्यात चोऱ्यांचे सत्र थांबेना..!

लवकरच अमळनेर शहराची चोरांचे शहर म्हणून निर्माण होऊ शकते नवीन ओळख...

तालुक्यात चोऱ्यांचे सत्र थांबेना..!

 

अमळनेर येथे गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात सर्वात जास्त चोऱ्या ह्या काही महिन्यात झाल्या आहेत. दुचाकी वाहने,मंदिरातील घंटा,पाण्याच्या मोटरिंपासून ते घरातील वस्तू,दागिने किंमती समानासह अनेक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विशेष चोऱ्यांचे एक पॅटर्न समोर आले आहे. एकाच साच्यात चोरी न करता वेगवेगळ्या ठिकाणी व पद्धतीने चोऱ्या केल्या जात आहेत. म्हणजे फक्त दुचाकी किंवा फक्त दागिने असे न करता चोऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या जात आहेत. कदाचित ह्या सर्व चोऱ्या करणारी एक टोळी कार्यरत असू शकते. फक्त शहरी भागात चोऱ्या होत नसून विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यात चोऱ्या होत आहेत.म्हणजेच एका पेक्षा अधिक लोक यात समाविष्ट असावेत.अगदी शाळा मार्केट परिसर देखील चोरट्यांनी सोडलेला नाही.

चोऱ्यांचे कारण अजून पर्यंत समोर आले नाही. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन काळात सर्वांवरच आर्थिक बिकट परिस्थिती कोसळली आहे.रोजगार बंद झाले आहेत.हातांना काम नाही घरची खाणारी तोंडे बंद नाहीत.या पार्श्वभूमीवर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे का? यासाठी कोणाला जबाबदार धरावे? सामान्य जनता सुरक्षित नाही.यातून मोठे प्रकार उद्धभवू शकतात.मोठ्या गुन्ह्यांमध्ये याचे रूपांतर होऊ शकते. गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. परिस्थिती किंवा स्वखुशी ने जरी अश्या अधिक प्रमाणात चोऱ्या होत असतील तर निश्चितच हे अमळनेर तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे.

अमळनेर पोलिसांचे खबरी नेटवर्क तसे स्ट्रॉंग आहे असे म्हटले जाते. पण अमळनेर तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जळगांव जिल्ह्यात भुसावळ नंतर गुन्हेगारीत अमळनेर चा 2 रा क्रमांक लागतो. अमळनेर चे खबरी नेटवर्क याबाबतीत काहीच तपास लावू शकत नाही का? की हे किरकोळ विषय म्हणून या कडे दुर्लक्ष केले जात आहे? कारण अवैध धंद्याच्या बाबतीत देखील अमळनेर टॉप ला आहे.वाळू,दारू,गांजा,घुटखा,मटका,सट्टा तालुक्यात जोरात आहे.याबरोबरच बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारे देखील बरेच जण आहेत. येणारा प्रत्येक अधिकारी फक्त ह्या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करत असतात.गल्लोगल्ली वरील सर्व अवैध धंदे सर्रास सुरू असतात.खबरी नेटवर्क या बाबत जोरदार कार्यरत असते.मग चोऱ्यांच्या तपासासाठी सदर नेटवर्क कामाला लागले तर निश्चितच चोऱ्यांना आळा बसू शकेल.अशी चर्चा सुरू आहे.

सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक असुरक्षित झाले आहेत. थोडं ही बाहेर गेले की चोरी होते अशी धारणा व धास्ती मनात बसली आहे. अगदी दवाखान्यात जाताना देखील चार वेळा विचार करावा लागतो असे मत एका नागरिकाने व्यक्त केले आहे.एका नागरिकाने तर पत्नी आजारी आहे पण तिला घेऊन दवाखान्यात गेलो आणि मागे चोरी झाली तर या भितीने पत्नीला एकटीलाच दवाखान्यात रवाना केले. अत्यंत कष्टाने निर्माण केलेल्या आपल्या संसारातील वस्तू चोरटा काही क्षणात लंपास करतो आणि वर चोरी झाल्या नंतर केस करा,गुन्हा दाखल करा आणि न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत बसा..चोर मिळाला तर वस्तू मिळणार अन्यथा नाही..त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

संबंधित लेख

Back to top button