Nashik

थोरात विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

थोरात विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
मोहाडी दिनांक १९ फेब्रुवारी

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी
मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते .अध्यक्ष व प्रमुख अतिथी जावेद शेख तसेस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर, नंदकुमार डिंगोरे, सुदाम पाटील,गणपत पाटील ,एल टी गुरूजी,बबन जाधव,जयेश घुमरे,सुधाभाऊ सोमवंशी,श्रीराम जाधव,भगवान जोशी,लक्ष्मण देशमुख, प्राचार्य श्रीराम खुर्दळ, पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख ,आय टी आय चे प्राचार्य हेमंत उगले ,अभिनवच्या मुख्याध्यापिका सोनाली देशभुख ,प्रदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .प्रमुख पाहुण्यांचा परिचय मंगेश वाळके यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी केले .आपल्या भाषणातुन त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली .त्यांच्या कार्याचा आपण सर्वांनी आदर्श घ्यावा असे सांगितले .
यावेळी संगीत शिक्षक दिलीप पागेरे व गीतमंचने शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी पोवाडयाचे सादरीकरण केले.
अभिनव बाल विकास मंदीरच्या विद्यार्धीनी जागृती भवर ,प्रेरणा पाटील,कृष्णा जाधव,युगंधरा जाधव,स्वराज शंखपाळ यांनी मनोगत व्यक्त केले .आपल्या भाषणातुन त्यांनी शिवाजी महाराज यांचे बालपण, आई जिजाबाई यांनी त्यांच्या वर केलेले संस्कार, स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष, राज्यात निर्माण केलेली आदर्श न्यायव्यवस्था याविषयी माहिती दिली .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जावेद शेख यांनी यांनीही आपल्या भाषणातुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली.अंत्यत प्रतिकुल परिस्थिती असतांना त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.एक आदर्श राजा म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते.प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले.आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले की शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अन्याय, अत्याचार याविरूद्ध लढा दिला .व आदर्श राज्यांची स्थापना केली .आज आपण सर्वांनी शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करावे व त्यांचा आदर्श घ्यावा असे आह्वान केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप जाधव ,सोनाली खरात व सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमास अभिनव बाल विकास मंदिर,माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामनाथ गडाख व शरद निकम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद सोनवणे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button