Delhi

पहा फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपींनी काय व्यक्त केली शेवटची इच्छा

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त निर्भयाला समर्पित पहा फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपींनी काय व्यक्ती शेवटची इच्छा

नवी दिल्ली, 23 जानेवारी :2012 मध्ये दिल्ली येथे सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषींकडून फाशीची शिक्षा थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी फाशीच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी तुरुंग प्रशासनाकड़ून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, प्रॉपर्टी तत्सम गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे.मध्यंतरी दोषींना माफ करावे अशीही मागणी करण्यात आले परंतु अत्यन्त स्पष्टपणे निर्भयाच्या आईने नकार देत आपल्या मतावर ठाम राहिल्या आहेत.पहा फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपींनी काय व्यक्त केली शेवटची इच्छानिर्भयाच्या चारही गुन्हेगारांनी फाशीच्या भीतीनं खाणं-पिणं सोडलं….चौघा आरोपींपैकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडलं आहे. पवनचेही खाणं-पिणं कमी झाल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या दोघांचा तुलनेत मुकेश व अक्षय यांच्या मात्र वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. मुकेशने तर फाशी टाळण्यासाठी सर्वच स्तरावर कायदेशीर प्रयत्न केले आहेत. याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली आहे.पहा फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपींनी काय व्यक्त केली शेवटची इच्छाभारतीय कायदयानुसार प्रत्येक फाशी जाणाऱ्या व्यक्ती ला शेवटीची इच्छा विचारली जाते त्यानुसार चारही आरोपींना त्यांच्या इच्छा विचारल्या नन्तर काहीच प्रतिक्रिया दिली नाही असे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले.निर्भयाच्या आरोपींना दि 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. यादरम्यान मुकेश व्यतिरिक्त उर्वरीत तीन पैकी जर कोणी दया याचिकेचा अर्ज केला तर पुन्हा काही दिवसांसाठी ही फाशी पुढे ढकलण्यात येईल. यानंतर पुन्हा फाशीची नवी तारीख दिली जाईल, असे कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आरोपींच्या गळ्याचं माप घेताना त्यांना अनावर झाले अश्रूनिर्भया प्रकरणात चौघा नराधमांच्या फाशी साठी चौघांच्या गळ्याचं माप घेण्यात आलं आहे.आरोपींना गळ्याचे माप घेताना चौघा आरोपींना अश्रू अनावर झाले. मृत्यू डोळ्यासमोर दिसत असल्याने केलेल्या गुन्ह्या चा पच्छाताप होत होता. फाशी देताना सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे असे तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.फाशी देताना आरोपी चे वजन जेवढं अधिक तेवढं त्याला कमी उंचीवरून फासावर लटकवलं जाते.पहा फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपींनी काय व्यक्त केली शेवटची इच्छाफाशी देताना दोर तुटला तर फाशी माफ होते का फाशीची शिक्षा अंमलात आणण्याची पूर्ण जबाबदारी ही जल्लादाची असते. मात्र तुरुंगाच्या नियमानुसार फाशी देताना फास जर तुटला तर दोषीची शिक्षा माफ होते का? याबाबत तिहार जेलमधील फाशीची अंमलबाजवणी करणाऱ्या पवन जल्लादने खुलासा केला आहे. “जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचं ठरत तेव्हा संपूर्ण खबरदारी घेतली जात असते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कुणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडली नाही. फाशीची अंमलबजावणीही ठरल्याप्रमाणे बजावली गेली आहे”,असे पवन यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button