आजपासून अन्न सुरक्षेच्या नियमात बदल…प्रत्येक खाद्य विक्रेत्याला परवाना आवश्यक..!
एक ऑक्टोबरपासून अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या परवाना घेणे बंधनकारक आहे. या द्वारे मिळणाऱ्या क्रमांक आल्या शिवाय खाद्य विक्रेत्याला खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
पण हे तितकेच अनिवार्य आणि गरजेचे होते कारण जे खाद्य आपण खातो आहोत ते किती सुरक्षित आहे हे पाहणे देखील आवश्यक आहे.
अन्नसुरक्षा आणि मानद प्राधिकरणाने सर्व राज्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि नियमन विभागाच्या नवीन सूचना जारी केल्या आहेत. खाद्य व विक्रेत्यांना परवाना घेणे सक्तीचे आहे तसेच त्यासाठी दर दोन वर्षांनी एक दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.
हॉटेल, ढाबा, किराणा, दुकान, मीठाई, दूध व इतर सर्व खाद्यपदार्थ व्यवसायिकांना सक्तीचे आहे. यासाठी अन्नपदार्थ विक्रेत्याला केंद्र सरकारची मान्यता असलेला परवाना दिला जाणार आहे.