अर्थसंकल्प Live 2020 : उद्योग आणि दळणवळण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प
? भाषणातील ठळक मुद्दे :
▪ भारतीय उत्पादनाचा निर्यातीवर भर, प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र व्हावा यासाठी प्रयत्न करणार.
▪ मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती भारतात व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार.
▪ उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद.
▪ रस्ते विकासावर सरकारचा भर, 2 हजार किलोमीटरचे किनारी रस्ते तयार करणार.
▪ देशभरात 9 हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करणार.
▪ दिल्ली -मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार,
▪ 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार, रेल्वेच्या रिकाम्या जागेत सौर प्रकल्प उभारणार.
▪ तेजस सारख्या गाड्यांनी पर्यटन स्थळे जोडणार, पीपीपी तत्वावर रेल्वेच्या खाजगीकरणाची चाचणी करणार.
▪ मुंबई-अहमदाबाद दरम्यान जलद रेल्वे गाड्या वाढविणार.
▪ उडान योजनेअंतर्गत 100 नव्या विमान तळांची निर्मिती करणार