अर्थसंकल्प 2020 : कृषी क्षेत्रासाठी तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प..
भाषणातील ठळक मुद्दे :
▪ विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर.
▪ अन्नदाता ऊर्जादाता होण्यासाठी प्रयत्न करणार, शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर व्हावा म्हणून प्रयत्नशील.
▪ सेंद्रिय खते वापरण्यासाठी प्रोत्साहन, पाण्याची कमतरता असलेल्या 100 जिल्हयांसाठी विशेष काम करणार.
▪ 20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात येणार, 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ.
▪ शेतकी मालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी किसान रेल्वे चालविली जाणार.
▪ महिला बचत गटांना प्रोत्साहन देणार, दूध उत्पादकांसाठी खास योजना, 2025 पर्यंत दुग्ध उपन्न दुप्पट करू.
▪ गाव स्तरावर गोदामांची निर्मिती केली जाणार, शेतकऱ्यांसाठी 16 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद.
▪ जिल्हास्तरावर फळबाग विकासासाठी प्रोत्साहन देणार, शेती आणि ग्राम विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद.
▪ मत्स्य उत्पादन 200 लाख टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट, किनारपट्टीतील तरुणांसाठी सागरमित्र योजना राबविणार.
▪ 112 जिल्ह्यांमध्ये आयुष्यमान रुग्णालयांची निर्मिती करणार.