आघाडी सरकारला उघडे पाडा — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन
नितीन माळे
फडणवीस सरकारने केलेल्या ऐतिहासिक जलयुक्त शिवार अभियानामुळे भरपुर पाणी आहे मात्र या महाभकास आघाडीच्या काळात वीज नाही लोडशेडिंगने शेतकरी शेतमजूर होरपळतो आहे, होमगार्ड ते पोलीस पाटील यांच्या मानधनाचा प्रश्न असो वा शालेय पोषण आहारातील अनियमितता सर्वच पातळीवर जनता त्रस्त असून भाजपा सरकारच्या काळातील सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या अनेक योजना बंद करणाऱ्या महाभकास आघाडीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी पेटून उठावे या निष्क्रिय महाभकास आघाडीला उघडे पाडा असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.भाजपचा राज्यव्यापी धरणे आंदोलनात शेतकरी बांधवां समवेत पाचोरा येथे तहसीलदार कैलास चावरे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील, माजी जि प सभापती पोपट तात्या भोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, माजी जिप सदस्य डी एम भाऊसाहेब पाटील ,जिप सदस्य मधुकर काटे ,तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे,शहराध्यक्ष रमेश वाणी, माजी पं स सभापती बन्सीलाल पाटील, नरेंद्र पाटील वसंतराव पाटील, हिम्मत नाना निकुंभ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.