Ahamdanagar

श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे रानमात्र या अन्नछत्रालयाचा वर्धापन दीन थाटात संपन्न?

श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे रानमात्र या अन्नछत्रालयाचा वर्धापन दीन थाटात संपन्न?

सुनिल नजन/अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील रानमाळ या अन्नछत्रालयाचा वर्धापन दिन थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे हे होते. तर अध्यक्ष स्थानी हनुमान टाकळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेरमन अशोकराव काजळे हे होते. प्रथम रानमाळ या अन्नछत्रालयाचे संचालक डॉ रामदास बर्डे आणि संतोष बावणे यांनी अतिथींना वर्षभर उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचा मांन्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.चेरमन अशोकराव काजळे यांच्या हस्ते केक कापून उपस्थित मांन्यवरांनाही सन्मानित करण्यात आले. या अन्नछत्रालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना प्रीतीभोजन देण्यात आले.या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गोरक्ष दळवी, ऋषिकेश कर्डीले, गोटीराम वांढेकर, अमोल पाठक,लक्ष्मण डांगे,अरूण बर्डे भिवाजी कचरे, जेष्ठ नेते मोहनराव दगडखैर, युवा नेते अन्ना दगडखैर, निलेश काजळे,भाउसाहेब बलफे,मेजर योसेफ शिरसाट, श्रीराम बर्डे, विठ्ठल गायकवाड, सोपान गायकवाड,संजय बर्डे,संजय काजळे,यांच्या सह परिसरातील अनेक मांन्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button