Amalner

Amalner: ह्या गावात महिलेचा विनयभंग आणि किरकोळ कारणावरून मारहाण..!

Amalner: ह्या गावात महिलेचा विनयभंग आणि किरकोळ कारणावरून मारहाण..!

अमळनेर किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड व फायटर ने मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील निम या गावी घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुमनबाई दत्तात्रय आगळे रा निम हिने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याच गल्लीत राहत असलेल्या उत्तराबाई दगडु आगळे हिच्याशी मागील काही दिवसापासून उधारीच्या पैश्यांवरून किरकोळ वाद झाला होता. तेव्हा उत्तराबाई हीने दिर ईश्वर किसन आगळे हा सुटीवर आला की तुला पाहते अशी धमकी दिली होती.दि 29 जानेवारी रोजी सायंकाळी 06.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिचे पती दत्तात्रय आगळे, मुलगा ईश्वर, सुन मयुरी व मोठी सून सोनी व नात आकांशा असे घरातच गप्पा मारत बसले असताना तेव्हा अचानक ईश्वर किसन आगळे, दगडु किसन आगळे रा निम तसेच नारायण संजय शिरसाठ व आकाश संजय शिरसाठ रा तांदळी असे चार जण घराच्या अंगणात येवून मोठमोठ्याने शिवीगाळ केली.मुलगा ईश्वरने तुम्ही शिवीगाळ का करत आहे असे विचारताच घरात घुसून ईश्वर किसन आगळे याने फियदिीची साडी धरून वाईट उद्देशाने त्याच्या अंगावर ओढुन शिवीगाळ करत अंगणात ओढुन तु जास्त माती जायेल शे असे म्हणत मारहाण केली. यावेळी सुमनबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले.आकाश शिरसाठ व नारायण शिरसाठ यांनी हातातील फायटर ने मारहाण केली.दत्तात्रय आगळे यांना डोक्यावर,पाठीवर काठीने मारले.गावातील विक्की भिल,सुकलाल खैरनार,सुनील आगळे यांनी मध्यस्ती करत भांडण सोडविले.याबाबत मारवड पोलीस ठाण्यात भादवी 452,354,325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो ना सुनील तेली करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button