विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी झाले गायब….असली जंगलके “शेरोंके” के सामने खुद को “वाघ” समझने वाले गायब…..
अमळनेर दि 9 ऑगस्ट हा “विश्व आदिवासी दिन” म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाला जगभरात उत्स्फूर्तपणे मूलनिवासी निवासी दिन, धरतीपुत्र, भूमी पुत्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. अश्या या आदिवासींसाठी महत्वपूर्ण असलेल्या दिवसासाठी आमदार शिरीष दादा चौधरी सोडल्यास इतर कोणत्याही स्वतःला लोक प्रतिनिधी समजणाऱ्या नेत्यांची बोंब पडली नाही .मान्य आहे तालुक्यातील काही गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे त्यांना आपल्या सर्वांची गरज आहे परंतु थोडा वेळ आणि मदत या तथाकथित लोकप्रतिनिधींनी आदिवासी समाजासाठी खर्च केला नाही.हा निव्वळ जातीभेद, समाजभेद या तथाकथित नेत्यांनी स्पष्ट पणे जाहीर केला आहे. आदिवासी हे मूळ निवासी आहेत त्यांच्या साठी जर या नेत्यांना वेळ नसेल तर योग्य वेळ आल्यावर त्यांची जागा पण त्यांना आदिवासी समाज दाखविल्या शिवाय राहणार नाही. येत्या निवडणुकांमध्ये अश्या जातीभेद, वंशभेद करणाऱ्या नेत्यांना आदिवासी समाज जवळ पासही फिरकू देणार नाही याची त्यांनी कटाक्षाने नोंद घ्यावी.
ते आले नाही पाठिंबा दर्शविला नाही म्हणून आदिवासी दिन साजरा नाही अश्या तला भाग नाही परंतु यातून खरा चेहरा समोर मात्र आला आहे. खऱ्या जंगलातील आदिवासी सिंहाना वाघ घाबरणारच यात शंका नाही कारण खऱ्या सिंहांचा सामना वाघ करू शकत नाही. आदिवासी भागातुन आलेले स्वतःला आदिवासी समजणारे एकमेव सिंह च खऱ्या जंगली सिंहसोबत राहू शकतो यात ही आता शंका राहिली नाही. जंगलातील सिंहासोबत राहायला जिगर लागते ती अमळनेर तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधिं मध्ये दिसून येत नाही… अमळनेर शहरात एकच सिंहाने विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देणार बॅनर लावलं…. इतरांनी आता येऊनच बघावे मग बघू निवडणूकांमध्ये आदिवासी काय रंग भरतो ते….कल हमारा वक्त था थोडे दिनोंमें तेरा भी वक्त आयेगा…