रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकरी मोर्चा सह प्रांत कार्यालयावर दिली धडक..
विलास ताठे
रावेर-यावल तालुक्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्यांच्या हातून खरीपाचा पूर्ण हंगाम गेल्याने शेतकर्यांना सरसकट मदत देण्यात यावी या मागणीसाठी रावेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यासाठी शुक्रवार, 8 रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला.
विविध मागण्यांसाठी आमदारांच्या नेतृत्वात मोर्चा
यावल तालुक्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले असूनया नुकसानीमुळे शेतकर्यांच्या हातून खरीपाचा पूर्ण हंगाम गेला. उडीद, मूग व इतर कडधान्ये ज्वारी, मका, कापूस व हळद ही पिके उद्ध्वस्त झाल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई व वीज बिल माफी मिळावी, नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असलेतरी पंचनामे न करता शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुभाष चौकापासून रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.