Dharangaw

अंजनी मध्यमप्रकल्पातून पाणी सोडण्याची शक्यता

अंजनी मध्यमप्रकल्पातून पाणी सोडण्याची शक्यता

धरणगाव प्रतिनिधी:(कमलेश पाटील) एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प च्या क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होऊं शकते अति वृष्टी झाल्यास पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

अंजनी मध्यम प्रकल्प एरंडोल ता. एरंडोल जि. जळगाव
अंजनी धरणाची सध्याची पाणी पातळी 52%असून धरण फक्त 4ते 5फूट खाली असून सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52% टक्के पाणीसाठा झालेला आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतआहे, व हवामानखात्याच्या अंदाजा नुसार अति वृटीचा अंदाज असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल
अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून अंजनी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. कृपया जीवित वा वित्त हाणी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व पाटबंधारे उप विभाग एरंडोल,यांचेतर्फे करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button