Kalyan

कल्याणातील नव वधू-वरांचा समाजासमोर आदर्श तोंडाला मास्क बंधून केला विवाह

कल्याणातील नव वधू-वरांचा समाजासमोर आदर्श
तोंडाला मास्क बंधून केला विवाह

प्रतिनिधी:—-लक्ष्मण कांबळे

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असतानाही काही जण सर्रासपणे या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणातील एका जोडप्याचे करावे तितके कौतूक कमीच आहे. घरातल्या घरात विवाह सोहळा पार पाडत या जोडप्याने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

रुपेश भास्कर जाधव आणि प्रियांका जाधव अशी या नववधू वरांची नावं आहेत. रुपेश कल्याण कोर्टात वकिली करत आहे तर प्रियांका एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रात त्याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी गर्दी जमा होईल अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची किंवा विवाह समारंभ पुढे ढकलण्याची किंवा अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे शासनातर्फे आवाहन केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी या आवाहनाला लोकांकडूनच हरताळ फासत भव्य-दिव्यतेने विवाह सोहळे साजरे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुपेश आणि प्रियांका या दोघांनी मिळून त्यांच्या विवाहाबाबत घेतलेल्या निर्णयाचे इतरांनीही अनुकरण केले पाहिजे. घरच्या मंडळींसोबत विवाह करण्यासोबतच या दोघांनी विवाहाच्या विधीदरम्यान तोंडाला मास्क बांधून आणि सॅनिटायजरने आपले हात स्वच्छ धुवून लोकांना स्वच्छतेचा संदेशही दिला आहे. सामाजिक भान जपत संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याबद्दल दोघांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button