का आहे उद्या जनता कर्फ्यु,काय म्हणाल्या जिल्हाधिकारी मॅडम पहा
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी उपाययोजना म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे. आठवड्याच्या दर शनिवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु असणार आहे. उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 246 इतकी झाली असून जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्या वाढली नाही.
परंतु अनेक जण घोळक्याने उभारणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावताच फिरणे असं निदर्शनास येत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.