जनउन्नती बहुद्देशीय संस्थेद्वारा भंडारा शहरात गांधी जयंती निमित्त स्वछता अभियान राबविण्यातआले आहे. स्वछ भारत अभियान ची सुरवात भारत सरकार तर्फे २ ऑक्टोबर २०१४ पासून झालेली आहे. हा अभियान राजकारणा पासून अलिप्त आहे. स्वछता संदेश देणे आणि स्वछतेसाठी कार्यकारने एक देशभक्तीपर कार्य असून प्रत्येक व्यतींनी जबाबदारी घेऊन संपूर्ण भारत देश स्वछ करण्याचा संकल्प घेतला पाहिजे असे जनउन्नती बहुद्देशीय संस्थेने लोकांना आव्हान केले आहे. यानिमित्ताने जनउन्नती बहुद्देशीय संस्था भंडारा द्वारे शहरात कचऱ्याचे नियोजन करण्याकरिता कचरापेटी ची स्थापना करून भारत भंडारा स्वच भंडारा सुंदर भंडारा या अभियानाला सफल करण्याचा एक छोटासा प्रयास करण्यात आलेला आहे. ह्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक पंकज मुंधडा , समाजसेवक बाबा पटेल , चंद्रदीप शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी , हर्षा वैद्य , Dr. निखिल डोकरीमारे (RMO), सोनू उके जिल्हा समन्व्यक इत्यादी उपस्थित होते.
भंडारा प्रतिनिधी