Chalisgaon

तितुर नदीला अचानक पूर….

Story Highlights
  • तितुर नदीला अचानक पूर....

तितुर नदीला अचानक पूर….

नितीन माळे

चाळीसगाव शहरातील तितुर नदी ला अचानक पूर आल्याने नदीशेजारील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी गेले, काल रात्री मंगेश चव्हाण यांनी या भागाची पाहणी करून दुकानदार व नागरिकांना भेट दिली,
निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत मंगेश चव्हाण यांनी स्थानिकांशी चर्चा केल्यावर लक्षात आले की मागील अनेक वर्षापासून दर 2 ते 3 वर्षांनंतर मुसळधार पाऊस पडल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते, एकदा तर जुन्या नगरपालिका पर्यंत पाणी पोहचले होते.

हॉटेल दयानंद जवळील मोठ्या पुलाला केवळ दोन ठिकाणी पाणी पास होण्यासाठी जागा आहे, त्यामुळे वरून येणारे पाणी आणि जास्त आणि पुलाखालून पास होणारे पाणी कमी होत असल्याने बंधाऱ्याप्रमाणे हे पाणी अडवले जाऊन त्याचा ओव्हर फ्लो आजूबाजूला होतो व दुकानात पाणी जाते असे सांगितले.
याबाबत कायमस्वरूपीची उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून दर 2 – 3 वर्षांनी येणारी नैसर्गिक आपत्ती बंद होईल अशी भावना नागरिक व दुकानदार यांनी व्यक्त केली.
यानंतर मंगेश चव्हाण यांनी तहसिल प्रशासनाशी फोनवर संपर्क करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली व जास्तीत जास्त मदतीचा हात कसा देता येईल याबाबत चर्चा केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button