Amalner

? महत्वाचे..हिवाळ्यात शरीर आणि मनाला निरोगी ठेवण्यासाठी या आहारात हे पदार्थ समाविष्ट करा.

? महत्वाचे..हिवाळ्यात शरीर आणि मनाला निरोगी ठेवण्यासाठी या आहारात हे पदार्थ समाविष्ट करा.

आमळनेर विनोद जाधव.

हिवाळ्यात जसे आपल्या शरीराला वाचवण्यासाठी आपण उबदार कपडे परिधान करतो.तसेच आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अथवा,तंदुरुस्त ठेवण्यासाठी,आपल्या आहारामध्ये आपण या पदार्थांला समावेश करावा. आहारात वेगवेगळे बदल केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेली उष्णता मिळते.आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.हिवाळ्यात सुकामेवा खाणे अतिफायदेशीर असते.या मुळे शरीराला उर्जा मिळते. आणि आपल्या आहारात जास्तीत जास्त फळभाज्याच्या समावेश करावा.उदा.गाजर, मुळे, बटाटे,कांदा,आणि लसूण यांचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो.तसेच हे पदार्थ पचायला हलके असता.आणि शरीरात उष्णता निर्माण करतात.

हिवाळ्यात आपल्या आहार विहारच्या सवयी बदलल्यामळे वजनही वाढू शकते. तसेच या दिवसात शरीरातही अनेक बदल होतात. यामुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी योग्य आहार फायदेशीर ठरतो. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते…..

  • थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतात. पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.
  • ग्रीन टीचे सेवनही थंडीत उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी ऍक्‍सिडंट्‌स असतात. यामुळे अनेक बॅक्‍टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटीऍक्‍सिडंट मदत करतात.
  • हिवाळ्यात लसूण खाणं चांगले. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
  • गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा.
  • हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.
  • संत्री, द्राक्षं अशी फळांमध्ये क जीवनसत्त्वं असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.
  • या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.
  • गोड पदार्थ, शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ याचं सेवनही प्रमाणातच करावं. सर्दी, खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.
  • तेलकट पदार्थ खाण्याचे टाळावे.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जीवन शैली मोठया प्रमाणात बदलली आहे.रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. अनेकांचे काम,व्यवसाय बंद आहे. परिणामी शारीरिक आणि मानसिक बदल ही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे ह्या हिवाळ्यात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button