उत्तर महाराष्ट्रात आरपीआय(आठवले)पक्षाचा झंझावत सुरुच…
महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ताचा प्रवेश सोहळा संपन्न.
नाशिक(प्रतिनिधी)आज दिनांक 18/10/2020 रविवार रोजी आरपीआय (आठवले)उत्तर महाराष्ट्र शाखेची महत्त्व पूर्ण बैठक नाशिक येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय(आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष मा.रमेशजी मकासरे होते.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्रात गांव तेथे शाखा स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला.
*कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बुध्दवासी रविंद्रजी खरात यांच्या पत्नी रजनीताई रविंद्र खरात यांनी आरपीआय(आठवले)पक्षात जाहीर प्रवेश केला
*याप्रसंगी धुळे जिल्हाप्रमुख शशिकांत भाऊ वाघ,खांदेश प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणजी जाधव,उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेशभाऊ गांगुर्डे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनिलभाई यशवंते, उत्तर महाराष्ट्र नेते तुषारजी माने,धुळे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष नयनाताई दामोदर, धुळे जिल्हा महासचिव राजूबाबा शिरसाठ,धुळे जिल्हा सचिव आबा खंडारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते