आई या विषयावरील निबंध स्पर्धेत गौरव पवार प्रथम तर ओम राऊळ व्दितीय
अमळनेर- राष्ट्र सेवादलाच्या संस्कार केंद्राच्या वतीने आयोजित निबंध लेखन स्पर्धेत गौरव किशोर पवार(प्रथम) ओम विनोद राऊळ (द्वितीय) तर तेजस नंदलाल चौधरी (तृतीय) विजेते ठरले..
आई या विषयावर आयोजित या निबंध स्पर्धेत 35 स्पर्धक सहभागी झाले होते. आई चे अनोखे वर्णन करणाऱ्या स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले, धनंजय सोनार, भारती गाला, प्रकाश भास्कर महाजन, शिवाजी महाजन,चंद्रकांत जगदाळे, विनोद राऊळ,उत्तम तावडे ,दीपक पवार, दीपक पाटील, सोनवणे मॅडम, डॉ मिलिंद वैद्य मंगला पवार यांचे हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

कृष्णा महाजन, पुनवी नरेंद्र निकुंभ, राशी अविनाश निकुंभ, मिसबाह खाटीक, आदित्य पाटील या बालकांनी संयोजन केले
दर आठवड्यास होणाऱ्या या स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळत असल्याने समाज माध्यमात कौतुक होत आहे.






