India

Health: आरोग्याचा मुलमंत्र..प्रथमोपचार म्हणजे काय..?

Health: आरोग्याचा मुलमंत्र..प्रथमोपचार म्हणजे काय..?

प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीने ताबडतोब घ्यावयाची काळजी. प्रथमोपचार विषयाची कल्पना आधुनिक काळात आता जुनाट झाली आहे. आजच्या प्रथमोपचर काला उपचार करताना अग्रक्रम ठरवता आला पाहिजे म्हणजे आपण एखाद्या जखमी व्यक्तीला कशाप्रकारे उपचार करायचे याचे संपूर्ण ज्ञान असणे काळाची गरज आहे जर व्यक्तीला याविषयी ज्ञान असेल तर चांगला प्रकारे प्रथम उपचार करू शकेल.एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल किंवा इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपदग्रस्त व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नाई पर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना आपण प्रथमोपचार म्हणतो.असे उपचार जर केले तर अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
लक्षणानुसार करावयाचे उपचार
आपदग्रस्त मध्ये दिसणार्‍या लक्षणांच्या गंभीर ते नुसार त्याच्याकडे लक्ष पुरवणे जरूर असते. एखाद्या वेळेस खूप रक्तस्राव चालू असेल तर रक्तस्त्राव थांबवणे कडे प्रथम लक्ष द्यावे लागते. रक्तस्रावाची जागा शोधण्याकरता कपडे काढत बसण्यापेक्षा पुष्कळवेळा चटकन ते फाडावे किंवा कापणे अधिक हितावह ठरते व तोंडाला भोवतालच्या त्वचेचा रंग तसेच श्वासाचा गंध यावरून विषबाधेची कल्पना करता येते. अशा वेळेस रुग्णाला शक्यतोवर फारशे हलवू नये, त्याची मान एका बाजूस वळवून जिभ पुढे ओढावी. थंडी भरून भरू नये म्हणून पांघरून घालून नाडी बघावी.

बेशुद्ध असल्यास काहीही पेय देऊ नये वैद्यकीय मदतीसाठी संदेश पाठवावा व लक्षणानुसार ताबडतोब उपचार सुरू करावेत व्यक्ती जिवंत राहण्याकरता दोन नात्यावर शरीरक्रिया कार्यरत राहणे फार महत्त्वाचे आहे श्वास आणि रुधिराभिसरण रुधिराभिसरण क्रिया, हृदयक्रिया एकदम बंद पडल्यास व त्याच वेळी श्वास थांबुन मेंदूची भरून न येणारी आणि होण्याचा गंभीर धोका असतो. प्रत्येक प्रथमोपचारकाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.जेव्हा कोणी जखमी होते किंवा अचानक आजारी पडते तेव्हा संकटकालीन परिस्थिती असते अशा वेळी प्रथम उपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. खालील काही गोष्टींवर जर आपण लक्ष दिले किंवा दिलेल्या सूचना जर लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी आपण उपचार करू शकतो.

फिट येणे :

फिट येणाऱ्या व्यक्तीवर कोणते उपचार करायचे फिट येणाऱ्या वक्तीचे स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात व त्यानंतर झटके येऊ लागतात.रूग्ण जीभ चावू लागतो श्वास घेने थांबू शकतो. तोंड किंवा ओढ निळे पडू शकतात.लाड गळू लागते, तोंडातून फेस येऊ लागतो. अशा परिस्थितीत रुग्णाने श्वासथांबला थांबवीला तर हे चांगले लक्षण नाही. अशा वेळेस ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. अशावेळेस रूग्णा जवळच्या सगळ्या वस्तू दूर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मउ द्या.रुग्णांना श्वास घेणे थांबवले तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग उघडण्याचा प्रयत्न करा. दारा खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.पेशंट च्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चक्कर येणे :

जर एखाद्या व्यक्तीला चककर येत असेल तर त्याने लगेच खाली झोपावे.डोके गुडघ्या कडे न्यावे डोके गुढक्या कडे नेल्यास रक्तप्रवाह मेंदूकडे होऊ लागेल. जर रुग्ण बेशुद्ध झाला असेल तर रूग्णाचे खाली डोके वर पाय करा. अशा व्यक्तीच्या तोंडावर,गळ्यावर थंडपाणी मारा किंवा कपड्याने पुसा. बऱ्याच वेळा रुग्ण अशा प्रयत्नांनी शुद्धीवर येईल. अशा व्यक्तीला सतत प्रश्न विचारून तो पूर्णपणे शुद्धीवर आला किंवा नाही याची खात्री करून घ्या. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाण्यात बुडणे :

पाण्यात पडणे, पाण्यात बुडणे अशे अनेक प्रकार घडत असतात पाण्यात पडलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण पाण्याबाहेर काढले जाते तेव्हा त्याचा श्वास अडकला असेल किंवा श्वास घ्यायला त्या व्यक्तीला त्रास होत असेल तर अशा वेळेस प्रथम त्या व्यक्तीला कृतीम श्वास दिला जातो. अशा व्यक्तीवर उपचार करायचा असल्यास त्या व्यक्तीची श्वासनलिका मोकळी करा आणि हृदय तसेच श्वास चालू असल्याची खात्री करा. ती व्यक्ती बेशुद्ध असल्यास तिला विशिष्ट स्थितीत झोपवा. श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वास द्या.तोंडाने तोंडाला श्वास देणे हे क्रिया पाण्यात बुडलेल्या व्यक्ती साठी वापरली जाते.

प्रथमोपचाराची पेटीत काय काय असावं…?
आपद्ग्रस्तांसाठी प्रथमोपचाराची पेटी असणे आवश्यक आहे .यामध्ये निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्टी, तसेच जखमेवर बांधण्यासाठी जाडीची पट्टी असणे आवश्यक असते,चिकट पट्टी ,त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारे बँडेज, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, छोटे टॉर्च, हातमोजे दोन जोड्या, कात्री, ब्लेड, स्वच्छ व सुती कापडाचे तुकडे ,ऑंटी सेप्टीक डेटॉल किंवा सेवलोन, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली, निरनिराळ्या आकाराच्या शेपटी पिना, साबण, प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावे औषधांची मुदत संपताच बदलावेत.

डॉ किशोर बाळासाहिब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button