Mumbai

?️ ” खोटे संदर्भ देऊन कंगना सतत विष ओकते, तिला रोखलचं पाहिजे “स्वरा भास्कर

?️ ” खोटे संदर्भ देऊन कंगना सतत विष ओकते, तिला रोखलचं पाहिजे “

मुंबई | कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशातील हरियाणा, पंजाब, राजस्तान आणि इतर राज्यातील शेतकरी संघटना दिल्लीत आंदोलनासाठी गेल्या आहेत. मात्र काही दिवसांपुर्वी अभिनेत्री कंगणा राणावतने एका आंदोलनकर्त्या शेतकरी आजीला रोजावर आणल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्कर संतापली असून तिने कंगणावर निशाणा साधला आहे.

कंगणाला वादग्रस्त वक्तव्य करायला आवडतं. खोटे संदर्भ देऊन कंगणा विष ओकत असते. राजकारण, चित्रपट, क्रीडा कुठलाही विषय असो ती नकारात्मक ट्विटच करत असते. विशिष्ट अजेंडा चालवणाऱ्या अशा मंडळींना आपण प्रत्युत्तर द्यायला हवं, असं स्वरा भास्कर म्हणाली.
कंगणाला त्या आजीनेसुद्धा उत्तर दिलं होतं. माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रूपयासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे काम नसेल तर तु माझ्या शेतात मजुरीला ये, असं आजींनी म्हटलं होतं. महिंदर कौर असं त्या आजीचं नाव आहे.
दरम्यान, दिल्लीत शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये आजही बैठक झाली. मात्र आजच्याही बैठकीतून तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button