शेतकऱ्यांची होणारी पिळवणुक थांबवावी या साठी गडखांब येथे शेतकरी जागृती सभा संपन्न..
कृषीऊत्पन्न बाजार समिती
संदीप सैदाने
अमळनेर येथे शेतमाल विक्री करतांना एक क्विंटल मागे एक किलो कपात(कट्टी)केली जाते .दररोज शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल माल विक्रीस आणला जातो अर्थात ही व्यापाऱ्यंकडून शेतकऱ्यांची अंधाधुंद लुट आहे व ती अवाजवी असल्याकारणाने ती लूटमार थांबवावी या अनुषंगाने शेतकरी राजा जागरूक व्हावा म्हणुन राष्टिय किसान मोर्चा आणि गावरानी जागल्या सेना अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकाभर सभांचे आयोजन करण्यात येत आहे.पहिली सभा गडखांब ता अमळनेर येथे दिनांक ७/३/२०२० रोजी राञी पार पडली होती .
गडखांब येथे बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीतून क्विंटल मागे एक किलो कापलेली कटती बेकायदेशीरपने कापून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी जाहीर सभा दि 7,3,2020 रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आली होती, त्यात श्री ऍड योगेश पाटील,जवखेडेकर,हाय कोर्ट औरंगाबाद ,श्री दिनकर पाटील,शिरुडकर,सेवा निवृत्त सहाय्यक अधीक्षक अभियंता ,प्रा श्री शिवाजीराव पाटील गांधलीकर, अध्यक्ष राष्ट्रिय किसान मोर्चा,
प्रा श्री शिवाजीराव पाटील,लोन अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना,
प्रा श्री विस्वासराव पाटील जानवेकर,गावरान जागल्या अधक्ष्य
श्री गोकुळ धोंडू पाटील जवखेडेकर,
श्री रमेश व्यंकट पाटील
सचीव तापी उपसा सिंचन अमळनेर व ग्रामस्थ गडखांब हजार होते.






