Kolhapur

उत्क्रांती शिक्षणाची गरज* —-
-प्रा.डॉ. सौ.स्मिता गिरी

उत्क्रांती शिक्षणाची गरज* —-
-प्रा.डॉ. सौ.स्मिता गिरी

उत्क्रांती शिक्षणाची गरज* —-
-प्रा.डॉ. सौ.स्मिता गिरी
कोल्हापूर, दिनांक 26 डिसेंबर 2019.

राजेश सोनुने

शिक्षक हा वैचारिक क्रांती घडवून आणणारा समाजाचा अत्यंत संवेदनशील घटक आहे.
त्याची कमाई म्हणजे बुद्धिमत्ता व करक्षेत्र हे विद्यार्थी असतो. यामुळे देश उभारणीमध्ये तो व त्याची फॅमिली यांची जबाबदारी तितक्याच आदराने जर समाज घेत असेल तर त्याचे कार्य ही तितकेच योग्य प्रकारे समाज घडवण्यासाठी होऊ शकते.
आयुष्याची 30 महत्वाची वर्षे या व्यक्ती केवळ ज्ञान घेण्यासाठी व्यतीत करत असतात अशावेळी या अनमोल लोकांच्या क्रीटीव्हीटी, संशोधन यासाठी त्यांना आर्थिक व संरक्षित जीवन प्रदान करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या देशाची आहे.
जो देश शिक्षण व शिक्षक यांनी प्रेरित असेल तो देश नक्कीच प्रगती करत असतो.
कोणाचीही सॅलरी ही महागाई rate व currency जागतिक मूल्य यावर ठरत असते.
आज कोणत्याही शिक्षकाला कोणीही फ्री काहीही देत नाही व तो ते घेतही नाही, आहे त्या परिष्ठित तो आपल्या कुटुंबाला सपोर्ट करत असतो.
त्यामुळे पुस्तकांची ज्ञानाची ओझी ही जो ब्रेन उचलत असतो त्याची तुलना कोणत्याही हमलाने उचललेल्या ओझ्याबरोबर करू नये, दोन्ही पूर्णतः वेगळे आहे व त्यांच्या जागी ते योग्य आहे. तेव्हा कोणीही या गोष्टीची कुचेष्टा न करता त्यांना ज्ञान अद्यावत करण्यास मदत करावी म्हणजे देश ज्ञानाने प्रगती साधेल व संरक्षित होईल.
मंत्र्यांनीही त्यांना आंदोलन, मोर्चे यामध्ये न अडकवता त्यांच्या वाजवी मागण्या योग्य असतील तर जरूर त्वरित पूर्ण करन त्यांना बुद्धीला ज्ञानार्जन करण्यास मुक्त ठेवावं.
भारतीय मेंदू हा संस्कारित व कष्टाने तयार झालेला आहे, आज जगात braindrain च्या नावाखाली आपले हुशार विद्यार्थी परदेशात काम स्वीकारत आहेत.
आज ही उत्क्रांतीची वेळ आहे, आमचा विद्यार्थी मानान व आनंदाने ज्ञानार्जन करायला हवा, त्याला सर्व गोष्टी पुरवल्या जाव्यात व समाज उपयोगी गोष्टींमध्ये त्याने ज्ञानाने बदल घडवून आणावेत व राष्ट्र मजबूत करावे.
खेड्यातील विद्यार्त्यांना कष्टाची व नवीन गोष्टी शिकण्याची, समजावून घेण्याची तसेच प्रॉब्लेम सोडवण्याची शक्कल ही असते, या चा विचार समाजाने करून या मुलांना आवडीचे शिक्षण प्रदान करून त्या क्षेत्रात त्यांना गरुडाप्रमाणे मुक्त व उंच भरारी मारू द्यावी. निसर्ग स्वतःच उत्क्रांती घडवून आणत असतो यामुळे शक्ती, युक्ती, संरक्षण व कार्यशाळा यांनी खेडी उद्युक्त असावी.
समाजाला 2020 व्या वर्षात प्रारंभ करत असताना समाजाने याचा प्रामुख्याने विचार करावा व देशाचा पाया असलेल्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे.
भारत हा शेतीप्रधान देश आहे यामुळे शेती शिक्षण, पशुपालन, निसर्गसंवर्धन याना शिक्षण अभासक्रमात प्रामुख्याने अनिवार्य विषय बनवावे याची आज भारताला गरज आहे तरच कसलेला शेतकरी व गोंधळलेला विद्यार्थी स्वतःच्या कुवतीप्रमाणे कार्यक्षेत्र निवडेल व स्वतःचे जीवन आत्महत्यांकडे न वळवता आनंदाने फुलवू शकेन.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button