अखंड हरिनाम सप्ताहाची 125 वर्षांपासून चालू असलेली परंपरा सुरगाणा शहरात उत्स्फूर्तपणे सुरुवात
सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
सात दिवस चालणाऱ्या ह्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सकाळी काकड आरती,नंतर ,सकाळी ज्ञानेश्वररी पारायण,दुपारी प्रवचन,संध्याकाळी हरिपाठ,नंतर भोजन ,संध्याकाळी आरती, मग महाराष्ट्रतील कोणतयाही किर्तनकाराचे कीर्तन नंतर रात्री जागरण ह्या कार्यक्रमास संपूर्ण तालुक्यातील लोक कार्यक्रमास येतात आणि भक्ती मय वातावरण असते शहरातील सर्व लोक या कार्यक्रमास उपस्थिती राहते देवस्थान कमेटी ,गणेश मंडळ, युवक उत्साह कार्यक्रम होतो सर्व समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात त्यामुळे ऐकतेची भावना निर्माण होते, शेवटच्या दिवशी सर्व तालुक्यातील लोकांसाठी महाप्रसाद ठेवले असते, संपूर्ण शहरातून प्रभू राम यांची पालखी काढून दही हंडी फोडतात आरती करून सप्ताहाची सांगता होती