पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटके बद्दल भाजपतर्फे राज्य सरकारचा धुळ्यात करण्यात आला निषेध..
प्रतिनिधी : असद खाटीक
धुळे : राज्य सरकारने दडपशाहीचा वापर करून पत्रकार अर्णव गोस्वामी यांना दहशतवाद्यां प्रमाणे वागणूक देत अटक केल्याप्रकरणी राज्यात भाजपतर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे
धुळ्यात देखील भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेबाबत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत राज्य सरकारच्या विरोधामध्ये काळे झेंडे फडकवत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे
राज्यातील गृह विभागाचे ज्या ठिकाणी लक्ष असायला हवे त्या ठिकाणी लक्ष नसल्याचा आरोप करत धुळे तालुक्यातील निमगुळ येथे चिमुरडीच्या मारेकर्यांना पकडण्यास व सारंग खेड्यातील आदिवासी युवतीच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अपयशी ठरल असल्याचा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला आहे..