Maharashtra

परंडयात शिवभोजन थाळी केंद्र सुरु गरिबांना मिळणार ५ रुपयात जेवण

परंडयात शिवभोजन थाळी केंद्र सुरु गरिबांना मिळणार ५ रुपयात जेवण

प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोनायिषाणुऱ्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थीतीत गोर गरीब मुजरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे . या परिस्थितीचा विचार करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीचा विस्तार करून आता तालुक्याच्या ठिकाणी सुरू केल्याने गोरगरीब कामगार मजुरांना पाच रुपयात शिवभोजन थाळी परंडयातील तहसील कार्यालयासमोर सुरु झाल्याने गोर गरीबांच्या पोटाची सोय झाली आहे .
तहसील कार्यालयासमोर शिवभोजन थाळी सुरु झाली आहे . दररोज सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत शिवभोजन थाळी गोरगरीब कामगार मजुरांना मिळणार असुन सध्या संचारबंदी असल्यामुळे मजुरांनी मागणी केल्या ठिकाणी त्यांना केंद्र चालकांनी पोच देण्याचे सुचना शासणाने दिलेले आहेत . शासणाचा निर्देशानुसार थाळी गरजुंना पोच देत असल्याचे शिवभोजन केंद्रचालक दत्ता कोयले यानी सांगीतले त्याना फक्त १०० थाळ्याच देता येणार आहेत .
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झलेली परिस्थीतीत भुकेलेल्या आणि गरजु नागरीकांना पाच रुपयात जेवण मिळणार असुन याचा लाभ होणार आहे
शिवभोजन केंद्र दररोज
निर्जतुकीकरण करणे , नागरीकांना हात धुन्यासाठी साबण सॅनिटायझर ठेवण्यात यावे भोजनालय परिसर दररोज स्वच्छ ठेवण्यात यावे आशा सुचना देण्यात आल्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button