चीनचा हल्ला;२०जवान शहिद,चीनचे ४३ सैनिक ठार
प्रतिनिधी नूर खान
नवी दिल्ली
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक
आपापसात भिडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. एएनआयने
सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे जवळपास
२० जवान शहीद झाले आहेत. दरम्यान भारतानेही चीनला चोख
प्रत्युत्तर दिलेलं असून त्याचे जवळपास ४३ जवान ठार तसंच गंभीर
जखमी झाले आहेत. एएनआयकडे सुत्रांनी ही माहिती दिल्याचं
सांगितलं आहे. या जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी वास्तविक
नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टर्सची हालचादेखील वाढली असल्याचं
सुत्रांकडून समजलं आहे.
भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न
सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये
सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार
झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितलं आहे. पण यावेळी
दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचं
नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.” – भारतीय सैन्यांकडूनही
चोख उत्तर, चीनचे ४३ जवान ठार आणि गंभीर जखमी केले
आहेत.काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव
वाढण्याची शक्यता आहे.