Nashik

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास खोडसाळ अज्ञात समाजकंटकाने पाण्याच्या टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे नुकसान दीड एकरवर नुकसान शेतकऱ्याची वणी पोलिसात तक्रार

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास खोडसाळ अज्ञात समाजकंटकाने पाण्याच्या टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे नुकसान दीड एकरवर नुकसान शेतकऱ्याची वणी पोलिसात तक्रार

प्रतिनिधी : सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप बाळासाहेब मेधने यांनी केलेल्या दीड एकर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड केली आहे. या बागेची गोडी बहार छाटणी झाल्यानंतर निम्मा बाग पोंगा तर निम्मा दोडा अवस्थेत होता. मात्र  बागेसाठी फवारणीकामी लागणाऱ्या पाण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात समाजकंटकाने छेडछाड करून तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे ५ लाखांवर नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

    संदीप मेधने हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. त्यांनी आपल्या बागेची २ व २१ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात गोडी बहार छाटणी घेतली होती. या बागा पोंगा व दोडा अवस्थेत असताना नवीन घड व द्राक्ष वेलीची पाने जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नंतर त्यांनी  टाकीतील पाणी व वेलीच्या काड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यामध्ये 2 4D हे तणनाशक टाकल्याचे परीक्षणात समोर आले आहे. याबाबत नुकताच अहवाल मेधने यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे विकृताने खोडसाळ प्रकार केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र कष्ट घेऊनही आता हंगामातील नियोजन कोलमडले आहे.

     या  घटनेबाबत त्यांनी वणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पुन्हा छाटणी करून हाती काही आले तर खरे अन्यथा बाग तोडण्याची वेळ येऊ शकते असे संदीप यांनी सांगितले.

चिंचखेड, ता.दिंडोरी : तणनाशक पाण्यातून वेलींना मिळाल्याने वेलीची पाने व तयार होत असलेले द्राक्ष घड जळून गेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button