Amalner

तुम्हारे पास क्या है ??मेरे पास दंडा, मिडिया की मुंडी और बहुत सारा धन है और हमारें पास हमारी धरती माँ है…

तुम्हारे पास क्या है ??मेरे पास दंडा, मिडिया की मुंडी और बहुत सारा धन है

और हमारें पास हमारी धरती माँ है..स्वराज हिंदचे योगेंद्र यादव

अमळनेर

सरकार कडे एका हातात ,दंडा,दुसऱ्या हातात मीडिया ची गच्ची आहे खिश्यात प्रचंड पैसा आहे तर आमच्याकडे फक्त आमची आई , धरती माता आहे.
सी ए ए,एन सी आर,एन पी आर विरोधी लढाई हि धरतीमाते साठीची लढाई आहे.असे स्वराज हिंद चे योगेंद्र यादव यांनी छ. शिवाजी महाराज नाट्यगृहातील जाहीर सभेत सांगत दिवार चित्रपटातील अभिताभ व शशी कपूर यांचा संवाद ऐकविला.

योगेंद्र यादव यांनी आपल्या सव्वा तासाच्या संयमित भाषणात पुढे सांगीतले की, संविधानाच्या पहिल्याच पानावर स्वातंत्र्याचा कलम १५,१९,२१उल्लेख आहे.ज्यांनी या देशाचे संविधान ज्यांनी वाचले नाही ते आज आझादी,स्वातंत्र्याच्या च्या घोषणा देणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत.स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथिल भाषणात मी भारतीय असल्याचा गर्व आहे असे कारण आमच्या धरतीवर ज्यांनी ज्यांनी शरण मागितली त्यांना त्यांचा धर्म न विचारता शरण दिले आहे.लोकांनी विवेकानंदांचा हा समजून घेतला पाहिजे.

मी राष्ट्रात नाही तर महाराष्ट्रात ,संतांच्या भूमित, स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींच्या भूमित उभा आहे.हिंदी माझी मातृभाषा तर मराठी माझी मावशी आहे असे सांगत उमर खालिद कार्यक्रमाला येऊ न शकल्याचे दुःख व्यक्त केले.मागिल काही वर्षांपासून श्रीलंकेतून प्रताडीत होऊन भारतात येऊन बसलेले हिंदू तामिळी लोकांना ,नेपाळ,तिबेट मधून आलेले प्रताडीत बौद्ध नागरिकांना अजूनही पंतप्रधानांनी नागरिकता दिलेली नाही.आधी त्यांना द्या! सी ए ए कायदा इतर देशातील नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी नाही तर मुस्लिम समाजाला वेगळं पाडण्यासाठी केलेला कायदा आहे.

तुम्हारे पास क्या है ??मेरे पास दंडा, मिडिया की मुंडी और बहुत सारा धन है और हमारें पास हमारी धरती माँ है...

२२ फेब्रुवारी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीपासून ते २३ मार्च भगतसिंग यांच्या शहिद दिवसापर्यंत देशभर एन पी आर,एन आर सी,सी ए ए विरोधात असहकार आंदोलनाविषयी देशभर जनजागृती चळवळ उभारली जाईल असे योगेंद्र यादव यांनी जाहीर केले.
मंचावर आ.अनिल पाटील,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रतिभा शिंदे,मुकुंद सपकाळे,करीम सालार,जयवंत पाटील,नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील,सचिन धांडे,रामभाऊ संदानशिव,गोकुळ बोरसे,मनोज पाटील,संदिप घोरोड़े,मुखतार खाटीक,भारती गाला,ऍड शकील काझी,आदी मान्यवर होते. प्रा अशोक पवार यांनी सूत्रसंचालन केले.

तुम्हारे पास क्या है ??मेरे पास दंडा, मिडिया की मुंडी और बहुत सारा धन है और हमारें पास हमारी धरती माँ है...

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकशाही बचाव नागरी कृती समिती चे रामभाऊ संदानशीव,प्रा.अशोक पवार,रियजुद्दीन मौलाना,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,ऍड शकील काझी,गौतम सपकाळे,प्रा लिलाधर पाटील,पन्नालाल मावळे,ऍड रज्जाक शेख,भारती गाला,फैय्याज पठाण, सत्तार मास्टर,शराफत अली,राजू शेख,नगरसेवक शेखा हाजी,नगरसेवक नरेंद्र संदानशिव,फिरोज पठाण,सिद्धार्थ संदांनशिव,प्रा शिवाजीराव पाटील,विश्वास पाटिल,शाहरुख सिंगर, इमरान खाटीक,मुझफ्फर हाजी,खालिद भाई,जुबेर अझहर,अय्युब पठाण,गुलाम नबी,नावेद शेख,शेर खा पठाण,रोनक शेख,शफी पहेलवान आदीसंह शेकडो कार्यकर्त्यांनी सक्रिय परिश्रम घेतले
समता कला मंच व शाहरुख सिंगर यांनी सांस्कृतिक विद्रोही गीते व देशभक्ती पर गीते सादर केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button