Pune

राज्य सरकारच्या नाकर्तेपणाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्दः हर्षवर्धन पाटील – मदनवाडी-चौफुला येथे चक्काजाम आंदोलन…

राज्य सरकारच्या नाकर्तेपणाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्दः हर्षवर्धन पाटील – मदनवाडी-चौफुला येथे चक्काजाम आंदोलन…

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. राज्य सरकार हे ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळणेबाबत गंभीर नाही. ओबीसी समाजाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण मिळणे हा हक्क आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण पुर्ववत होईपर्यंत जाहीर झालेल्या पोटनिवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 26) दिला.
इंदापुर तालुक्यातील मदनवाडी-चौफुला येथे इंदापुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे या
मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मयूरसिंह पाटील, मारुती वणवे,
अशोक वणवे, कृष्णाजी यादव, अशोक शिंदे, संजय देहाडे, तानाजी वायसे,पराग जाधव, यशवंत वाघ, संपत बंडगर, रणाजित भोंगळे, प्रशांत वाघ, संदीप खुटाळे, तेजस देवकाते, संजय जगताप, माउली मारकड,दिनानाथ मारणे,हनुमंत काजळे, अभिमन्यू खटके,
जयदीप जाधव, कापिल भाकरे,अशोक पाचांगणे, संजय भरणे, जावेद शेख आदी उपस्थित होते.
अनैसर्गिकपणे आलेले राज्य सरकार मराठा, धनगर, ओबीसींच्या आरक्षणाबाबत गंभीर नाही. मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले तर धनगर आरक्षणाबाबत हे सरकार एक शब्दही बोलत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सरकारला सुचित करुनही सरकारने ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. केवळ राज्य सरकारच्या वेळकाढुपणामुळेच
ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी
आरक्षण रद्द झालेल्या 5 जिल्हा परिषद व 33 पं. सं.मध्येनिवडणुका जाहिर करुन ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार केले आहे, असा आरोप यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केला.ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही, असे त्यानी ठामपणे सांगितले.
यावेळी इंदापुर तालुका भाजपचे अॅड. शरद जामदार, मारुती वणवे, श्रीमंत ढोले, माऊली चवरे, गजानन वाकसे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेले आरक्षण पुर्ववत करावे, ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत करावा, ओबीसी समाजाचा जातनिहाय जनगणना करावी, आरक्षण पुर्ववत होईपर्यंत निवडणुका रद्द कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन पोलिस व महसुल प्रशासनास देण्यात आले. प्रास्ताविक इंदापुर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन पानसरे तर भाजप कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे यांनी आभार मानले. या आंदोलनामुळे बारामती ते अहमदनगर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button