अमळनेर
सध्या पावसाळा सुरू आहे नुकतीच अमळनेर ला देखील पावसाची सुरुवात झाली आहे. खूप प्रतिक्षे नंतर अमळनेर शहरात पाऊस पडला परंतु या पावसाने अमळनेर नगरपरिषदेचा “खड्ड्यात” गेलेला कारभार उजेडात आणला आहे. विकास कामांचा दावा करणारी नगरपरिषदेचा “खड्डामय विकास”प्रत्यक्षात नागरिक अनुभवत आहेत .शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे असून पाणी साचत आहे.शिवाजी उद्यानाच्या मागच्या बाजूस तलावच झाला आहे. तर आजी माजी राजकीय पुढारी,नेते असलेल्या पटवारी कॉलनी परिसरात चालन्यालायक रस्ता नाही.तांबेपुरा मध्ये जाण्यासाठी तर पोहतच जावे लागत आहे.स्वामींनारायन मंदिर,अग्निशामक विभाग,महाराणा प्रताप चौक इ अशी परिस्थिती जवळपास सर्व ठिकाणी असून अमळनेर शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे.
लोकप्रतिनिधी मात्र राजकारण करण्यात मग्न असून खुर्ची कशी वाचवता येईल याकडे लक्ष ठेवून आहेत.अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या पद्धतीने आणि नियमात बसेल तेवढे सहकार्य करत असून त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. ताबडतोब मुरूम,खडी टाकून रस्ते चालण्या योग्य बनवणे पाण्याचा निचरा करणे अत्यंत आवश्यक असून नागरिकांचे हाल थांबविणे महत्वाचे आहे. शाळा सुरू झाल्या आहेत विद्यार्थी शाळेत मोठ्या संख्येने जात आहेत आणि रस्त्यांवरून जाताना त्यांना कसरत कारवी लागत आहे.